HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई उच्च न्यायालयाकडून आरेतील मेट्रो कारशेडला हिरवा कंदील

मुंबई | राज्य सरकारला आरेतील कारशेड प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरिधातील दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. मेट्रो कारशेडसाठी आरेतील तब्बल अडीच हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याविरोधात अनेक पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र, या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज (४ ऑक्टोबर ) सुनावणी दरम्यान सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.

शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांना, जे वृक्ष प्राधिकरणात सदस्यही आहेत, त्यांना न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. आरेतील कारशेड उभारणीसाठी झाडांची कत्तल रोखण्यासाठी पर्यावरणवादी, स्थानिक आणि सेलिब्रिटीनी रस्त्यावर उतरुन विरध प्रदर्शन केली होती. मात्र, राज्य सरकार आरेत मेट्रोचे कारशेडवर उभारण्यासाठी ठाम होते. पर्यावरणप्रेमी न्यायालयाकडून मिळालेल्या नीराशेनंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प! – आशिष शेलार

Aprna

गदिमा यांचे सुपूत्र श्रीधर माडगूळकर यांचे निधन

News Desk

छत्रपती घराण्यांचा अपमान केल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा

News Desk