HW News Marathi
महाराष्ट्र

‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांवरील जीवघेणा हल्ला, २६/११ची आठवण करून देतो !

नवी दिल्ली | दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थ्यांवरील जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद दिल्लीसह देशभरात पडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे बोलविण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “हा हल्ला २६/११च्या हल्लाची आठवण करून देतो,” अशा शब्दात जेएनयूच्या हल्ल्याचा निषेध नोंदिवला.

“जेएनयूमध्ये हल्ला करणारे बुरखाधारी डरपोक होते. त्यांच्यात समोर येण्याचे धाडस नाही. ते जे कोण आहेत त्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. जे झाले ते टीव्हीवर पाहून मला २६/११ ची आठवण झाली आणि मी हे देशात घडू देणार नाही. पोलिसांनी इथे जर केवळ बघ्याची भूमिका घेत कारवाई केली नसेल,” असा आरोप मुख्यमंत्र्यांनी दिल्ली पोलिसांवर केला आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “माझे म्हणणे एवढेच आहे की सगळ्यांची निपक्षपातीपणाने चौकशी होऊ द्या आणि हल्लेखोरांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा हा ओरबाडून जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे.” “महाराष्ट्रामध्ये असले प्रकार कदापी सहन केले जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व युवकांना मी हेच सांगेन की दुसरीकडे जे काही घडते ते अयोग्य आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काळजी करण्याचं कारण नाही.आपण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहात,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे: आठवले

News Desk

अहिल्यादेवी जयंतीला पक्षीय रूप देण्याचा ‘राष्ट्रवादी’ चा प्रयत्न! – राम शिंदे

Aprna

आवास योजनांच्या कामांना गती देऊन प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या! – बच्चू कडू

Aprna