HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर असा मंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही”- सदाभाऊ खोत

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन देखील सुरू आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला राज्यातील विविध भागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि एसटीचा संप सुरू झाला. दरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने तसेच राज्य सरकार काहीच मनावर घेत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.

असा सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब सातत्याने म्हणतात की, चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा. तुम्हाला अनेकवेळा सांगितले कि चर्चा करा. मात्र, ते वारंवार सांगतायत चर्चा कुणाशी करायची. ऐन दिवाळीत राज्य सरकारने गरिबांच्या चुलीत पाणी टाकले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार केले नसल्याने त्यांनी दिवाळीही साजरी केलेली नाही. असा सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही, अशी बोचरी टीका आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबितच आहे. एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणी साठी गेल्या चौदा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे.दरम्यान राज्य सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून केला जात आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. परंतु आपण कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणार नाही, असंही सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले – सत्यजीत तांबे

News Desk

शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्या – नितीन राऊत

News Desk

राजीनामा घेण्यात आला नाही तर मी स्वतः दिला, राठोडांचा नविन प्लान

News Desk