HW News Marathi
महाराष्ट्र

गृह विभागाचा मोठा निर्णय; कोरोना कालावधीतील 188 अंतर्गत दाखल गुन्हे मागे घेणार

मुंबई | राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोना कालावधीत १८८ अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. कोरोना काळात राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांना पासपोर्ट व उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई सुद्धा कडक करण्यात आली. मात्र, आता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या उल्लंघनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या संबंधित नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. गृह खात्याने राज्यांतील १८८ अंतर्गत दाखल गुन्ह्यांची माहिती मागवली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणालेत.

कोरोना कालावधीत ज्या मुलांवर आणि नागरिकांवर नियम मोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गृह विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे की, असे गुन्हे आम्ही मागे घेत आहोत. मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच हा विषय मांडला जाईल. याबाबतची प्रक्रिया सुरू असून लवकरच मंत्रिमंडळाचे याबाबतचे आदेश आम्ही घेणार आहोत, असे वळसे-पाटील म्हणाले. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे आता लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे. कारण आता अनेकांना कोर्ट आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने ‘व्होट बँके’ चे नवे राजकारण !

News Desk

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाला सुप्रिया सुळेंचा विरोध

News Desk

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाववर शरद पवार जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधणार

swarit