HW News Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना भेटून देणार राजीनामा

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. आज (५ एप्रिल) हायकोर्टाच्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी स्वत: राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितली आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा द्यायला निघाले आहेत.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी तसे पत्र लिहित ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिले होते. दरम्यान, आज (५ एप्रिल) मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे.

या निर्णयानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सुरु झाली आहे. या सगळ्या मुद्यावरच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर महत्वाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थितीत आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप अतिशय गंभीर असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.

१५ दिवसांमध्ये चौकशी करा

मुंबई हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला १५ दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षण गमावले!

News Desk

मी सादर केलेली वानखेडेंची कागदपत्रे खोटी निघाल्यास मंत्रिपद सोडेन; नवाब मलिकांची रोखठोक भूमिका!

News Desk

सोनई हत्याकांडातील 6 दोषींना फाशीची

swarit