HW News Marathi
महाराष्ट्र

“सुनलो हमारी बात…” आमदार बच्चू कडूंचे पावसात सरकारविरोधी आंदोलन

मुंबई | प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. कडू यांनी राज्य सरकार विरोद्धात हे आंदोलन सुरू केलेल्याचे त्यांनी सांगितले आहे. विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच चक्क पडत्या पावसात कडूंनी आंदोलनास बसले आहे. विधानसभेच्या विधिमंडळ अधिवेशनाचा आज (२ जुलै) शेवटचा आहे. कडू यांच्या मतदारसंघातील समस्यांकडे सरकार जाणून-बुजून दुर्लक्ष करत असून त्यांच्या मतदारसंघातील कामांना केवळ मंजुरी दिली. मात्र सरकार निधी देत नसल्याचा आरोप करत कडूंनी हे एकदिवसीय आंदोलन पुकारले आहे.

आता विधानसभेेचे पुढील अधिवेशन हे नव्या सरकारचे पहिले अधिवेशन होणार आहे. कडूंनी त्याच्या मतदारसंघातील २०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले. परंतु सरकारकडून त्याला अद्याप निधी मिळाला नाही. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचेही भूमिपूजन झाले, पण त्यालाही निधी दिला नाही. अचलपूर जिल्हानिर्मित्तीचाही प्रश्न महत्त्वाचे आहे. वासनी प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाची अधिसूचना सरकारने काढावी. राजुरा येथील घरांना १५ लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी कडू यांनी केली आहे. आंदोलन करताना कडू यांनी “सुनलो हमारी बात…” असा बोर्ड अंगावर लटकावत, एकदिवसीय आंदोलन करत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवाच्या १२७ वर्षांच्या परंपरेत प्रथमच खंड पडणार

News Desk

बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

News Desk

मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता परमबीर सिंह गायब, गृहमंत्री वळसे पाटील यांचे वक्तव्य!

News Desk