HW News Marathi
Covid-19

दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना-युवकांना परतण्यासाठी प्रवासव्यवस्था करा !

मुंबई | लॉकडाऊनमुळे दिल्ली येथे अडकलेल्या,मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्याना राज्यात परत आणण्यासाठी प्रवासव्यवस्था करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. दिल्ली, कोटा येथे विविध परीक्षांचे विद्यार्थी अडकून पडले असल्याच्या बातम्या झळकत होत्या.

यासंदर्भात युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी तात्काळ ट्विट करून मदतीसाठी विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दिल्लीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी सत्यजीत तांबे यांच्याशी संपर्क करुन राज्यात स्वगृही परतण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र सरकारने देखील यासाठी प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला होता.

विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता सत्यजीत तांबे यांनी देखील या प्रकारणात पुढाकार घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ट्विट करून प्रवासाची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. सोबतच त्यांनी महाराष्ट्र शासनाचे पत्रदेखील जोडले आहे.विद्यार्थी स्वताचा खर्च करण्यास तयार असल्याचे देखील सांगितले आहे. आमचा दिल्ली सरकारसोबत यासंबंधी वार्तालाप सुरू असल्याचे तांबे यांनी यावेळी सांगितले. यापुर्वी राजस्थानमध्ये कोटा येथे कोचिंग क्लासचे विद्यार्थी सत्यजीत तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांना राजस्थान सरकारने प्रतिसाद दिला होता आणि कोटा येथील विद्यार्थी राज्यात स्वगृही परतण्यास निघाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी दोनदा लस घेतली अन् जिवंत आहे बघा !” असे सांगत झिरवळ आदिवासी पाड्यांवर का फिरतायत ?

News Desk

देशात गेल्या २४ तासात ४९,९३१ नवे रुग्ण आढळले

News Desk

बीडची चिंता वाढली ! कोरोनाबाधितांचा आकडा ३६ वर

News Desk