HW News Marathi
महाराष्ट्र

दंगलसदृश परिस्थितीवर महाराष्ट्र पोलीस महासंचालक संजय पांडेंचं आवाहन

मुंबई | त्रिपुरात मुस्लिम समजावर झालेल्या कथित हिंसाचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवार म्हणजेच कालपासून (१२ नोव्हेंबर) महाराष्ट्रात उमटत आहेत. नांदेड, अमरावती, मालेगावसह महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल शहरं आणि परिसरांमध्ये काही मुस्लिम संघटनांकडून तीव्र बंद पुकारण्यात आला. परंतु, या बंदने अत्यंत हिंसक वळण घेतलं. त्यामुळे या ठिकाणी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. या जिल्ह्यात दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. अनेकजण गंभीर जखमी झालेत, ज्यात पोलिसांचाही समावेश आहे. यामुळे राज्यातील वातावरण तणावपूर्ण झालेलं असताना आता महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील जनतेसाठी एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे

पोलीस महासंचालक संजय पांडे म्हणतात की, हिंसा करणं कोणत्याही माणसासाठी चांगली बाब नाही. उलट आपल्यालाच या हिंसेचे वाईट परिणाम भोगावे लागतात. यात पोलिसांना काही लोकांना अटक करावी लागते. त्यात जर तरुण मुलं असतील तर त्यांचं भविष्य आंधारात जातं. मला अजूनही असं वाटतं की, वेळ गेलेली नाही. निर्णय आपल्या हातात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आमची पूर्ण जबाबदार आहे आणि त्यात पोलीस कमी पडणार नाही.”

आपल्या राज्याशी संबंध नसतानाही…!

आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करताना संजय पांडे म्हणाले की, नाईलाजानं आम्हाला फोर्सचा वापर करण्यास भाग पाडू नका. आमच्यावर अशी वेळ राज्यातील नागरिक आणार नाही अशी अपेक्षा आहे. जर तशी वेळ आलीच तर आम्ही कमी पडणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. संचार बंदीचं आपण पद्धतशीरपणे पालन करावं. आपला राज्याशी संबंध नसतानाही जे काही झालं असेल ते आपण बाजुला ठेवू आणि जसा इतर जिल्ह्यात शांतता आहे तसंच शांततेचं वातावरण आपण कायम ठेवूया”, असंही डिजीपी संजय पांडे म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन् वधूची घोड्यावरून मिरवणूक निघाली

News Desk

राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून आता शुद्धीकरण!

News Desk

“तत्कालीन फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे”, हसन मुश्रिफांचं विधान

News Desk