HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता ८९.५३% वर  

मुंबई | राज्यातील कोरोनास्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२८ ऑक्टोबर) जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ४३० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात तब्बल ८ हजार ४३० जण कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १४ लाख ८६ हजार ९२६ इतकी आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट देखील आता ८९.५३ टक्क्यांवर पोहचला आहे.

https://twitter.com/ANI/status/1321456617976557571?s=20

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडा आता १६ लाख ६० हजार ७६६ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनामुळे आपला जीव गमावलेल्यांचा एकूण आकडा ४३ हजार ५५४ वर पोहोचला आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत राज्यात १ लाख २९ हजार ७४६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही अधिकृत आकडेवारी जारी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावी कोरोना मॉडेलचं जगभरात कौतुक, फिलिपिन्समध्ये धारावी मॉडेल राबवणार

News Desk

राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम! – मुख्यमंत्री

News Desk

मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी आता थेट १ सप्टेंबरला होणार

News Desk