HW News Marathi
महाराष्ट्र

महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, राज्य सरकारचे रेल्वेला पत्र

मुंबई | महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिले आहे. नवरात्रीच्या एक दिवसाआधी राज्य सरकारने सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचे जाहीर केले होते. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली होती. मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांची आता प्रवासाचा पेच सुटला असे वाटत असतानाच रेल्वेने परवानगी नाकारल्याने हिरमोड झाला. अशात आता राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारं पत्र पाठवले आहे. मात्र रेल्वे बोर्डाने याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही आहे. पुन्हा एकदा राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवास करु द्यावा असं या पत्रात म्हटलं आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे.

ठाकरे सरकारने सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासासाठी १७ ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मुभा दिली होती. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली. त्यामुळे सरसकट महिलांना लोकलचा प्रवास करता आलाच नाही. यावरुन काँग्रेसने भाजपावर आरोप केले आहेत. तसेच, मंदिरं उघडण्यासाठी घंटानाद करणारे भाजप नेते हे आता महिलांसाठी लोकल सुरु व्हावी म्हणून घंटानाद का करत नाहीत असा उपरोधिक प्रश्नही आघाडी सरकारकडून उपस्थित केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मराठा आरक्षणा बाबत मोठी बातमी,’ राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार बहाल करण्याची तयारी!

News Desk

साताऱ्याची यात्रा ही माझ्यासाठी तीर्थयात्रासारखी !

News Desk

भाजप लाचार नाही, ‘होय’ युती आम्हाला हवी आहे !

News Desk