HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका महाविकासआघाडी एकत्र लढणार!

औरंगाबाद | शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आले होते आणि भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं युद्ध पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारला ‘एकीचे बळ’ लक्षात आलेले असताना आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पन्हा एकदा एकत्र लढण्याची चिन्हे दिसून येत आहेत. गावागावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचंच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर ६१८ ग्रांमपंतायतींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या रुपाने एकत्र लढणार आहे. तशी माहिती महाविकास आघाडीच्या गोटातून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ग्रांमपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळालं तर अनेक गावातील राजकीय समिकरणे बदलणार हे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा चुरशीचा सामना रंगलेला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्या – धनंजय मुंडे  

News Desk

भाजपचं ‘मिशन बारामती’ यशस्वी होणार? का भडकल्या निर्मला सीतारामन

Manasi Devkar

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदानाची मुख्यमंत्र्याची घोषणा

Aprna