HW News Marathi
महाराष्ट्र

सर्व माध्यमात दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

मुंबई। राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं पूर्वीच्या शासन निर्णयात बदल करुन सर्व माध्यमांमध्ये दहावीपर्यंत सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व माध्यमांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला असल्यानं मराठी भाषा प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. मराठी विषय सक्तीचा करण्यात आला असून शासन निर्णयाच्या भंग करणाऱ्या संस्थांना लाखभर रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. मराठी विषय टाळणाऱ्या शिक्षण संस्थांना चाप लावण्यासाठी निर्णयात सुधारणा करण्यात आली आली असून हा ठाकरे सरकारचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे.

शासन आदेशात सुधारणा करून त्यात मराठी भाषा सक्तीची

महाराष्ट्रातील राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय शाळा आणि खासगी शाळांमध्ये आता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पूर्वी जारी केलेल्या शासन आदेशात सुधारणा करून त्यात मराठी भाषा सक्तीचा असे स्पष्टपणे नमूद करत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सोमवारी नवीन जीआर जारी केला. शासनाच्या या निर्णयामुळं यंदापासून मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.

शिक्षण विभागानं आदेशात दुरुस्ती करुन नवा आदेश जारी केला

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्याचे आदेश जारी केले होते. इयता 5 वी ते दहावी पर्यंतच्याच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय (व्दितीय) शिकवण्याबाबत आदेशात नमूद केले होते. त्यात मराठी विषय सक्तीचा असा उल्लेख नव्हता. त्यामुळे अनेक शाळांनी शासन आदेशाचा फायदा घेतला आणि मराठी विषय दुस-या क्रमांकावर शिकवण्यास सुरुवात केली. खासगी शाळांनी पळवाट काढल्यामुळे शालेय शिक्षण विभागानं आदेशात दुरुस्ती करुन नवा आदेश जारी केला आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन जीआर जारी केला

महाराष्ट्रातील राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय शाळा आणि खासगी शाळांमध्ये आता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पूर्वी जारी केलेल्या शासन आदेशात सुधारणा करून त्यात मराठी भाषा सक्तीचा असे स्पष्टपणे नमूद करत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सोमवारी नवीन जीआर जारी केला. शासनाच्या या निर्णयामुळं यंदापासून मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे.

मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी हा निर्णय नक्कीच उपयोगी

महाराष्ट्रातील मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयात मराठीला मानाचं स्थान असंल पाहिजे, अशी भूमिका भाषाप्रेमींनी घेतली आहे. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी हा निर्णय नक्कीच उपयोगी ठरेल. मराठी भाषा ही ज्ञान संपन्न भाषा असल्याची जाणीव शाळा आणि महाविद्यालयांना असलं पाहिजे, अशी भूमिका देखील भाषा प्रेमींनी घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मिशा काय, भुवया पण काढून टाकेन”, उदयनराजेंचे शिवेंद्रराजेंना आव्हान

Aprna

सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं आणि महाराष्ट्रातही तसंच होईल – संजय राऊत

News Desk

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न! – उपमुख्यमंत्री

Aprna