HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपालांची भेट रद्द!

मुंबई। 8 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडला आहे. त्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. संध्याकाळी 6 वाजता महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, आज होणारी ही भेट रद्द झाल्याची माहिती मिळतेय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितलं होतं की, राज्यपाल कोश्यारी यांनी आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर भेटण्यासाठी बोलावलं आहे. त्यानुसार आज ही भेट होणार होती. मात्र आता ही भेट होणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

20 ऑगस्ट रोजी पत्रकारांशी संवाद साधला

राज्य सरकार माझ्याकडे 12 सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता?; असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीका केली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केलं आहे. मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहे, असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं.अजित पवार यांनी 20 ऑगस्ट रोजी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं होतं. राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना जाऊन भेटणार आहोत, असं अजित पवार म्हणाले होते.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीसेवेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

News Desk

शेतकरी कन्यांचे पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

News Desk

मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; तणावाचे वातावरण

News Desk