HW News Marathi
महाराष्ट्र

दूध पुरवठा सुरळीत राहणार | मुख्यमंत्री

नागपूर | दूध पुरवठा सुरळीत राहणार असून राज्यात तुटवडा निर्माण होऊ देणार नाही. असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनने आज राज्यभर दूध आंदोलना सुरु झाले आहे. या दूध आंदोलनाचा परिणाम आज जाणवत नसला तरी, उद्या या आंदोलनाचा परिणाम ग्राहकांना जाणवेल.

खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक करून महाराष्ट्र राज्यात दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांची दरवाढ द्यावी, अशी मागणी करत आंदोलन सुरू केले. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. तर या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले असून आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर दूध फेकले आहे.

राज्यात रविवारी रात्री १२ वाजल्यापासून दुधाचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती !

News Desk

‘एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने, भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय’

News Desk

महाराष्ट्राचं नेतृत्व एका चांगल्या हातात आहे, ग्रामपंचायत निवडणुकीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

News Desk