HW News Marathi
महाराष्ट्र

“….अरे ते दुश्मन आहेत का? की ते पाकिस्तानातून आलेत” भुजबळांचा मोदींना सवाल

मुंबई। पावसाळी अधिवेशन यंदा दोनच दिवसांचं असल्याने आधीच महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षनेते यांच्यात वादावादी सुरु आहे. काल (५ जुलै) भाजपच्या १२ आमदारांना निलंबन केल्यामुळे राजकीय वातावरण बिघडलं आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे मांडण्यात आले, यातच कृषी कायद्यांवर सुद्धा चर्चा करण्यात अली.

“ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?”

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोनल सुरूच आहे. हे आंदोलन सुरू असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशानात केंद्राच्या कृषी कायद्यांना आव्हान देणारी तीन कृषी विधेयक विधानसभेत मांडली. या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. शेतकरी आंदोलनासंदर्भातील केंद्राच्या भूमिकेवर टीका करताना “दोन-चार दिवसांचं आंदोलन किती त्रासदायक असतं. मग हे आंदोलन आठ महिन्यांपासून सुरू आहे. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?,” असा सवाल उपस्थित केला.

पंतप्रधान मोफत धान्य पुरवतात, पण पिकवतो कोण ?

“कोरोनात प्रत्येक जण सॅनिटायझर लावून काम करत होता. पण, शेतकऱ्यांनी कुटुंबासहित शेतात राबत होता. त्याने करोना पाहिला नाही, रोगराई बघितली नाही. त्याने अन्नधान्य पिकवलं. इतरांना आपण करोना योद्धे म्हणतो, शेतकरीही करोना योद्धाच आहे. पंतप्रधान मोफत धान्य पुरवतात, पण पिकवतो कोण… त्या शेतकऱ्याने काय गुन्हा केला. त्यांचं म्हणणं इतकंच होतं की हे कायदे अन्यायकारक आहेत. मग तरीही कायद्यांचा अट्टाहास का? अनेक उद्योगपतींनी तयारीही केली. आता हा सगळा कारभार एकदोन लोकांच्या हातात जाणार,” असं इशारा भुजबळांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एसएफआय करणार राज्यव्यापी आंदोलन

News Desk

राज्यात काल 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त!

News Desk

ईडीच्या नोटीसी नंतर परिवहन मंत्री अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk