HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्री जयंत पाटील म्हणाले ‘हा माझ्यासाठी भावूक क्षण…’

सांगली | जिल्ह्यातील जत तालुक्याला ६ टीएमसी पाणी दिल्याने तालुक्यातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांना राखी बांधत औक्षण केले आहे.दरम्यान हा क्षण माझ्यासाठी फार भावनिक असून या भगिनींनी दिलेल्या प्रेमाबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील आज जत तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.

गेली अनेक वर्षे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्याची ६५ गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मागच्या आठवड्यात जयंत पाटील यांनी घेतला. जत तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याच्यादृष्टीने जयंतराव पाटील यांनी हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याने तालुक्यातील जनता समाधानी आहे.

बहिण-भावाचं नातं जितकं प्रेमळ आहे तितकंच ते अत्यंत संवेदनशील मानलं जातं. या बंधनावर अनेक प्रसंगी लिहिलं गेलं आहे. देशाच्या तसंच महाराष्ट्राच्या राजकारण भाऊ-बहिणींच्या जोड्या आहेत. त्यातल्या काहींचं राजकारण हे विरोधात आहे तर काहींच सोबत. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी भाऊ-बहिणीचं भावनिक राजकारण उभ्या महाराष्ट्राने पाहिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संग्रामपूर शहर विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करा! – बच्चू कडू

Aprna

उल्हासनगरात गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मृतदेहासह ठिय्या आंदोलन

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यातः अशोक चव्हाण

News Desk