HW News Marathi
महाराष्ट्र

मीराबाई चानूनं देशवासियांना समर्पित केलं ऑलिम्पिक पदक….!

टोकियो। स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरत देशाच्या शिरपेचात मााचा तुरा रोवला. मीराबाई चानूनं टोकियो ऑलिम्पिकमधील आपलं रौप्य पदक देशवासियांना समर्पित केलं आहे

चाहत्यांचे आभार मानले

मीराबाई चानूने ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. मीराबाई चानूनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलंय की, “काल मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं. सर्व भारतीयांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. मी माझं पहिलं पदक देशवासियांना समर्पित करतेय

मीराबाई चानूनं आपल्या यशाचं सर्व श्रेय देशवासियांना दिलं. मीराबाई चानूनं पुढे बोलताना म्हटलं की, “सर्व देशवासियांमुळे मी टोकियो ऑलिम्पिकमध्ये एवढं मोठ यश मिळवू शकले. मी सर्वांचे आभार मानते”

रौप्यपदक मिळवलं आहे

टोकियो इथं सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना विजयी भव म्हटले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे. आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया, त्यांचा उत्साह वाढवूया. सोशल मीडियावर देखील ऑलिंपिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आता कॅम्पेन सुरु झाले आहे, असंही मोदी यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समन्वयातून सीमावाद सोडवावा! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Aprna

आर्यन खान ‘रिलिज’! आर्थर रोड जेलमधून २७ दिवसानंतर सुटका

News Desk

पंकजा मुंडें आता जाणार मध्यप्रदेशात, विधानसभा, लोकसभेचा करणार प्रचार

News Desk