HW News Marathi
महाराष्ट्र

भास्कर जाधवांनी पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर बिनशर्त मागितली माफी; जाणून घ्या नेमके घडले?

मुंबई | आमदार भास्कर जाधव यांनी ‘काला धन लाने का है की नही लाने का… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. यु ही रखने का.. ‘., अशा शब्दात मोदींची अंगविक्षेप केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात गोंधळ करण्यास सुरुवात केली. या गदारोळानंतर सभागृह १५ मिनिटासाठी स्थगित केली होती. जाधव यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्यात आली. आज (२२ डिसेंबर) सभागृहात लक्षवेधीच्या वेळी वीज बदलाताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोदीनी शेतकऱ्या आश्वासनची विरोधकांना आठवण करून दिली बोलत हेते. राऊत म्हणाले, “तुम्ही इथे सूट देता, सुट तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर केले होते. मी शेतकऱ्यांना १५-१५ लाख त्यांच्या खात्यात देईन कुठे दिले, यावेळी सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली,” असे राऊतांनी विधिमंडळात म्हणाले.

 जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.  मोदींची नक्कल करताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटले आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. मोदींना देशातील लोकांनी बहुमतांनी निवडून दिले आहे. पंतप्रधानाबद्दल असे वक्तव्य करने आणि त्यांची नक्कल करने, योग्य नसल्याचेही ते म्हणाले. सभागृहात माफी मागा, माफी मागा, अशा घोषणाबाजी करण्यात आल्या होत्या. जाधवांनी माफी मागण्याबाबत फडणवीस आक्रमक पवित्र करा असे म्हणाले. पंतप्रधानानंबद्दल कोणत्याही प्रकारचे वाईट ऐकून घेणार नाही. तसेच जाधवांचे निलंबन करा अशी मागणी फडणवीसांनी सभागृहात केले आहे. 

जाधव यांनी माफी मागा नाही तर त्यांचे निलंबन करा अशी मागणी फडणवीसांनी सभागृहातील सभापतींकडे केले आहे. जाधव जे काही बोलेत ते रिकोर्डवर गेले आहे. त्यांची अध्यक्षांनी तपासणी करावी आणि मग त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना केली आहे. जाधवांनी मोदींची केलेली नक्कलचे रिकोर्ड तपासून त्यांच्यावर कारवाई करण्या येईल, असे सभापतींनी सभाृहात म्हटले आहे. 

दरम्यान, सभागृह स्थगित करा आणि रिकोर्ड तपासून घ्या, अशी आक्रमक मागणी फडणवीसांनी केली आहे. यावर जाधवांनी पुढे म्हणाले, “मी पंतप्रधानांनी केलेल मोदींचे केलेल अंगविक्षेप आणि शब्द मागे घेते. पण सभागृह स्थगित करू नका,” असे भास्कर जाधव म्हणाले. म्हणजे भास्कर जाधवांनी अंगविक्षेप केल्याचे मान्य केले आहे. मग त्यांनी माफी मागावी, अशी पुन्हा एकदा फडणवीसांनी केली आहे. जाधवांनी माफी मागावी, अशी मागणी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभापतींकडे केले आहे. 

नेमके काय आहे प्रकरण

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विज बिल माफवर सभागृहात बोलत होते. राऊत म्हणाले, मी ऊर्जा मंत्री म्हणून शपथ घेताना माझे व्हिजन काय आहे हे सांगू तो. माझे व्हिजन होते, की १० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याी योजना आखेन. परंतु, राज्यात ऊर्जा मंत्री झाल्यानंतर कोरोना आला लॉकडाऊन झाले. लॉकडाऊनच्या काळा नियमितपणे आणि सुरळीत वीजेचा पुरवाठा झाला की नाही हे आपण या ठिकाणी सांगा, असा उलट सवाल राऊतांनी विरोधकांना केला. त्यामुळे वीजेचा पुरवठा झाला, वीज वापर केली, त्यानुसार वीज बिल देण्यात आली, ही बिले दिली पाहिजे. या कंपन्या ज्या वीज पुरवठा करतात. सरकारची कंपनी जरी असली तरी ते लिमिटे कंपनी आहेत.  यांचेही काही अधिकार आहेत. आणि त्यांना वितरण करत असताना कर्ज घ्यावे लागते. आणि ज्यांच्याकडून वीज विंकत घेतात. त्यांना कोळशासाठी त्यांचे कारखाने चालवण्यासाठी पैसा द्यावा लागतो. त्यामुळे आपण जेव्हा वीजेचा वापर करतो. जे वीज बील आहे ते भरलेच पाहिजे.  आणि वीज बिल भरले जावे, या मताचा मी आहे, असे राऊत म्हणाले. विरोधकांनी दुसरा प्रश्न बोलताना राऊत म्हणाले, तुम्ही इथे सूट देता, सुट तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जाहीर केले होते. मी शेतकऱ्यांना ५०-५० लाख त्यांच्या खात्यात देईन कुठे दिले,  यावेळी सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 

 जाधवांनी मोदींची नक्क आणि माफी

विरोधक हे शब्दाचा शब्द छळ करत आहेत. पंतप्रधान असे बोले नाहीत, ते चलाकीने असे बोलतात, त्यात सुधारणा ऐवढीच करूया की दे २०१४ साली पंतप्रधान होण्यापूर्वी ते असे शंभर वेळा बोलेत. ‘काला धन लाने का है की नही लाने का… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. यु ही रखने का.. ‘., अशा शब्दात मोदींची नक्कल भस्कर जाधव यांनी सभागृहात केली. मी माफी मागावी असा आग्रह विरोधी सदस्यांकडून होतो आहे. अशा प्रकारचे प्रसंग या सभागृहात अनेकवेळा आले. एखाद्या गोष्टीसाठी माफी मागितल्याने माणूस लहान होतो असं नाही”, असे भास्कर जाधव म्हणाले

सभागृहात फडणवीस काय म्हणाले

यावर फडणवीस सभागृहात म्हणाले, “मी आवाहन देतो, पंतप्रधा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. असे म्हटलेले वाक्य आणून दाखवावे. नाही तर सभागृहाची माफी मागावी, जे या सभागृहात नाही त्यांच्याबद्दल असे चुकीचे वक्तव्य करता येणार नाही, कारण ते उत्तर देण्यास इथे नसतात, असा आपला नियम आहे, असे ते यावेळी म्हणाले. मोदींनी असे म्हटल्याचा एकही पुरवा दाखवा नाहीतर माफी मागा. यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. देशाच्या पंतप्रधानांबद्दल चुकीचे वक्तव्य रिकोर्डमध्ये ठेवले जात असेल तर हे मान्य नाही, असेही ते म्हणाले. महत्वाची लक्षवेधी असल्यामुळे मंत्र्यांचे उत्तर पूर्ण झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही, असे सभागृहातील सभापती म्हणाले. 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रावणाचा जीव जसा बेंबीत, तसा काहीचा जीव मुंबईत; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

Aprna

‘निवडणुकीला उभं करून पाडायचं षडयंत्र संजय काकांनींच रचलं’, भाजपाच्या माजी आमदाराचा खासदारावर गंभीर आरोप!

News Desk

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावाला देणार भेट….!

News Desk