HW News Marathi
महाराष्ट्र

“…तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा”, खोतांची परबांवर टीका

मुंबई। “तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा”, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं संदर्भात चर्चा करायची तरी कोणाशी हे नेतृत्वहीन नेतृत्वहीन आंदोलन असल्याचं परब म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर खोत म्हणालं, “अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा, ” अशी टीका त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.
एसटीचे शासनात विलीनीकरण करावं या मागणीसाठी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर गेलं आहेत. अद्याप एसटी आंदोलनावर कोणताही तोडगा काढता आला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचं सध्या मुंबईच्या आझाद मैदान आंदोलन सुरू आहे. अनिल परबांची साडी-चोळी, नारळ देऊन ओटी भरणार, असे म्हणत भाजपचं नेते गोपीनाथ पडळकर यांनी परबांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर परबांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बोलायचं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांशी बोला | पडळकर

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे नेतृत्व ही आहे, असे परबांनी काल (१९ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना म्हणालं. यावर पडळकरांनी प्रत्युत्तर दिले की, “बोलायचं कोणाबरोबर येथे तुमचे बाप-आई बसलेत. त्यांच्याशी ऐवून बोला. आझाद मैदानात मी बोलत असताना माझा आवज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जात असेल. तर हा आवाज एसटी कर्मचाऱ्याचा आवाज आहे. जर तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलता, असे म्हणत सरकारवर टीका केली. एसटीचे राज्यात विलीनीकरण करा, एवढी मागमी आहे. दुसरी, तसरी आमची मागणीच नाही, असेही ते यावेळी म्हणालं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस-राष्ट्र्वादीकडून मनधरणीचा प्रयत्न, हर्षवर्धन पाटील मात्र ‘नॉट रिचेबल’

News Desk

साताऱ्यात ‘नारळफोड्या गॅंग’; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

News Desk

जिहादी दहशतवादाशी निघडीत विचारलेल्या प्रश्नामुळे सावित्रिबाई फुले विद्यापीठ अडचणीत

News Desk