HW News Marathi
महाराष्ट्र

पडळकरांच्या जीवाला धोका, संरक्षण देणं सरकारची जबाबदारीच! – सदाभाऊ खोत

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना संरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. “गोरगरिबांचे आणि बहुजनांचे प्रश्न घेऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात आवाज उठवत असल्याने पडळकरांवर ल्ला केला जात आहे. राष्ट्रवादीकडून हा हल्ला घडवून आणण्यात येत आहे. तसंच, पडळकरांच्या जीवाला धोका असून त्यांना संरक्षण देण्यात यावं. ती सरकारची जबाबदारी आहे”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत, यापुढे राष्ट्रवादीची गुंडागर्दी सहन केली जाणार नाही, असा इशाराही खोत यांनी दिला.

रविवारी (७ नोव्हेंबर) सांगलीमध्ये एक मोठं प्रकरण घडलं. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं. उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन पडळकर विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी गटात तुफान वाद झाला. त्यात गोपीचंद पडळकरांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. हा हल्ला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. ह्यात पडळकरांच्या ताफ्यातील एक गाडी फुटली तर त्यांचे काही कार्यकर्तेदेखील जखमी झाले.

सदाभाऊ काय म्हणाले?

“गोपीचंद पडळकर हे गोरगरिबांचे आणि बहुजनांचे प्रश्न मांडतात. म्हणून राष्ट्रवादीने त्यांच्यावर हल्ला घडवून आणला आहे. मात्र, यापुढे ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही. भविष्यात पडळकरांच्या जीविताला धोका असल्याने त्यांना तत्काळ संरक्षण देण्यात यावं,” अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.

पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर…!

रविवारी सांगलीत झालेल्या राड्यावरून आता भाजप आक्रमक झाला आहे. “पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही”, असा इशारा देत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे पडळकरांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. “पडळकरांवर भ्याड हल्ले होत आहेत. सरकारच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुमच्यावर हल्ले करू ही मानसिकता चुकीची आहे. विरोधी पक्षाचं काम सरकारच्या विरुद्ध बोलणं आहे. सरकारचे घोटाळे बाहेर काढणं आहे. त्यांना लक्ष्य केलं जात आहे. सरकराने विशेषता मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांना सुरक्षा द्यावी”, असं फडणवीस म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘PMO कडून फोन आला अन्…’

News Desk

भोकरसह इतर पाणी टंचाई असलेल्या गावासाठी मंजूर कामे त्वरीत करा! – अशोक चव्हाण  

Aprna

एकनाथराव खडसे व रोहिणीताईं पासून माझ्या जीवाला धोका; शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

Aprna