HW News Marathi
महाराष्ट्र

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मागणी

मुंबई | दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं, निर्बंधांच्या काळातील वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशा अनेक सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्या आहेत. राज ठाकरे यांनी काल (५ एप्रिल) मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचनांची माहिती दिली. राज ठाकरे यांनी आज (६ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मिशन ब्रेक द चेन, अनिल देशमुख राजीनामा यासह विविध विषयांवर भाष्य केलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या सूचनांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून. सूचना योग्य असून मंत्रिमंडळाशी चर्चा करुन उपाययोजना करु, असं त्यांनी म्हटलं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या सूचना

उत्पादन : छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्यास सांगितलं मात्र विक्री करण्यास मनाई केली. अशा व्यापाऱ्यांसाठी आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा दुकानं खुली ठेवण्यास परवानगी दिली.

बँक : लोकांकडे पैसे असतील तर त्यांना बँकांकडे जातील. सरकारने बँकांशी बोलून घ्यावं. बँक सक्तीने पैसे वसूल करत आहेत.

वीज बिल माफ करणे : व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं

कंत्राटी कामगार : अनेक कंत्राटी कामगार सरकारने घेतलं होतं. या कामगारांना परत बोलवा, त्यांना महापालिकेत कायमस्वरुपी घ्यावं. कंत्राटी कामगारांच्या विषयाकडे लक्ष द्यावं.

मनोरंजन क्षेत्र, सलून यांनाही आठवड्यातून दोन-तीन वेळा दुकानं सुरु करण्यास परवानगी द्यावी.

क्रीडा क्षेत्र : सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळणं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, परंतु सराव करायला मंजुरी मिळावी.

शेतकरी : राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल.

शाळा : शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा.

पत्रकार परिषदेच्या सुरूवातीला बोलताना राज ठाकरे म्हणाले,”काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी कॉल केला होता. लॉकडाउनच्या संदर्भात मी त्यांना भेटीची विनंती केली होती. त्यांचा मला कॉल आला. त्याच्या आजूबाजूला कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. त्यांनी झूमवर बोलता येतील, असं ते म्हणाले. पुन्हा एकदा लॉकडाउन हे लोकांमध्ये पसरलं. रुग्णांची संख्या वाढतीये. किंबहुना…. किंबहुना वापरलं तर चालेल ना?,” असं राज म्हणाले. त्यावर सगळ्यांनी हसून होकार दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेल्या जवानाला तीन वर्ष शिक्षा

News Desk

वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना धमकी देणारा आहे तरी कोण? – सुधीर मुनगंटीवार

News Desk

जाणून घ्या… आज मराठी पत्रकार दिन का ? साजरा करतात

News Desk