HW News Marathi
महाराष्ट्र

“दहीहंडीला मान्यता द्यायची नव्हती मग बैठक कशाला?”, बाळा नांदगावकरांचा सवाल

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(२३ ऑगस्ट) घेतलेल्या बैठकीत दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री-उप मुख्यमंत्री, दहीहंडी मंडळाचे प्रतिनिधी, टास्क फोर्सचे सदस्य आणि पोलीस यंत्रणेत बैठक झाली, ज्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. परंतू सरकारच्या या निर्णयाला आता मनसेचे जोरदार विरोध दर्शवला आहे.

दहीहंडी साजरी करायला मान्यता द्यायचीच नव्हती तर मग मिटींग घेतली कशाला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी साठी मनाई केल्यामुळे त्यांना आता विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. दहीहंडी साजरी करायला मान्यता द्यायचीच नव्हती तर मग मिटींग घेतली कशाला. आम्हाला आमचं म्हणणं नीट मांडूही दिलं नाही. हे सरकार हिंदूद्वेष्ट सरकार आहे, ज्यांना दहीहंडी साजरी करायची आहे त्यांनी ती करावी मनसे त्यांच्यासोबत आहे असं म्हणत बाळा नांदगावकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आकांक्षा पायदळी तुडवण्याचं काम या सरकारने केलं

बाळा नांदगावकर यांनी पुढे बोलत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. “सण हा प्रत्येक धर्मातल्या लोकांनी साजरा करायलाच हवा. पिढ्यानपिढ्या हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. कोरोनाच्या आणि दुसऱ्या-तिसऱ्या लाटेच्या नावाखाली किती निर्बंध आमच्यावर घालणार आहात आणि आम्ही का सहना करायचं हे? मध्यंतरी मोहरम झाला त्याला परवानगी देण्यात आली, आमचं काहीही म्हणणं नाही पण सरकारने आमच्या धर्माचाही सन्मान राखला पाहीजे. हे सरकार हिंदूद्वेष्ट आहे. हिंदूच्या इच्छा, आकांक्षा पायदळी तुडवण्याचं काम या सरकारने केलंय”, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

आम्ही कोणतेही निर्बंध पाळणार नाही

यावेळी बाळा नांदगावकरांनी सरकारचे निर्बंध मानायला नकार दिला आहे. “आम्ही कोणतेही निर्बंध पाळणार नाही, सरकारने नियम आखून द्यावेत त्याप्रमाणे सण साजरा होईल. दोन तासांचा प्रश्न होता, काय अडचण येणार होती त्यात? पण आम्ही नियम पाळतो म्हणून आमच्यावर निर्बंध आणि जे पाळत नाहीत त्यांना काहीच नाही हे आम्ही सहन करणार नाही. ज्यांना दहीहंडी साजरी करायची आहे त्यांनी करावी मनसे त्यांच्या पाठीशी आहे.”

उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच

अतुल भातखळकर हे नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून आघाडी सरकारवर निशाणा साधत असतात. दहीहंडी रद्द करण्याच्या निर्णयावरूनही त्यांनी ट्विट करत कह्णत व्यक्त केली आहे. “उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारने समन्वय समितीने केलेल्या तमाम सूचना धुडकावत दहीहंडी उत्सवावर बंदी लादली. या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये”, असं ते म्हणाले आहेत.

सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही

राम कदम यांनी ट्विट करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. ते म्हणले, “काही गोविंदा पथकं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत. सर्व गोविंदा पथकांची इच्छा आहे की यंदा गोविंदा उत्सव जोमात, धुमधडाक्यात साजरा करता यावा. यावेळेची दहीहंडी या महाराष्ट्रातील हिंदूविरोधी सरकारनं कितीही रोखली तरी आम्ही थांबणार नाही,” असं राम कदम या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. “आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा हिंदूंचा उत्सव आहे. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले. मात्र इतरांचे उत्सव येतात तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते, हा दुटप्पी न्याय कसा?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील

सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजे, पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला आहे.

आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ

बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे… गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत… त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावी, लस घेतल्यावर देखील काही देशात लाँकडाऊन करण्यात आलंय… इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय… अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे… कारण अनेकांची हातावर पोट आहेत.. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलांय… आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात खासगी बसमधून १०० % प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला संमती

News Desk

एसटी महामंडळाचा ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

News Desk

अकोला अन् नागपूरमधील निकालात भाजपने मोठ्या प्रमाणावर केला घोडेबाजार! – नवाब मलिक

News Desk