HW News Marathi
महाराष्ट्र

कपिल पाटील यांचं मनसे नेत्याकडून स्वागत!

ठाणे | केंद्रीय मंत्रायनच्या जनयात्रेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनयात्रेला सुरुवात झाली असून त्यांनी ठाण्यापासून या जनयात्रेची सुरुवात केली आहे. भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सगळीकडे रंगात आहेत आणि राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता कपिल पाटलांचं स्वागत मनसे नेते राजू पाटील यांनी केलं आहे. या स्वागतमुळे आता नवीन चर्चांना उधाण आलं आहे.

राजू पाटील यांच्याशी माझे घरचे संबंध

एकीकडे जिथे राजकारणी एक दुसऱ्यांवर टीका करत असतात, तिथेच दुसरीकडे त्यांच्यातली मैत्री देखील दिसून येते. मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेत पाटील यांचं स्वागत केलं. याविषयी पाटील यांनी सांगितलं की, राजू पाटील यांच्याशी माझे घरचे संबंध आहे. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ते सदस्य होते. ज्याला कोणाला मला आशीर्वाद द्यायचा आहे, ते आशीर्वाद देऊ शकतात. त्याला पक्षाच्या चौकटीत बांधणे योग्य होणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

वर्चस्व मोडित काढण्यासाठी कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रीपद दिलं

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडित काढण्यासाठी कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रीपद दिलं असल्याची राजकीय वर्तुळात आहे. याविषयी पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रीपदं दिली आहेत. ती भाजपला मोडित काढण्यासाठी दिली आहेत का? कुणाला मोडीत काढण्यासाठी मला मंत्री पद दिलं नाही तर माझ्या पक्षाचे सदस्य जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी मी काम करणार असल्याचं पाटील यावेळी म्हणाले आहेत.

काम निकृष्ट दर्जाचं झालं

कपिल पाटील यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधून त्यांना टोला लगावला आहे. कपिल पाटील यांनी रस्त्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. आपण ज्या कल्याण शीळ रस्त्यावरुन यात्रा केली, त्यावर बोलताना कल्याण-शीळ रस्त्याचं काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरु आहे. त्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. त्यांच्या मागणीनुसार या रस्त्याच्या कामाची चौकशी केली जाईल, असं पाटील यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर शहापूर-कर्जत हायवे या रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायत विधेयकावरून हसन मुश्रीफ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद, अखेर विधेयक मंजूर

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक…..!

News Desk

बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं – संजय राऊत

News Desk