HW News Marathi
महाराष्ट्र

रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही !

मुंबई | “रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही,” असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला लगावला आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले, “पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून आलेल्या मुस्लमांना आधी हुसकावून लावणार असेल तर म्हणत एनआरसी आणि सीएएला माझा केंद्रला पूर्ण पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ९ फेब्रुवारीला मनसेचा सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहे,” अशी माहिती राज ठाकरे यांनी आज (२३ जानेवारी) गोरेगाव येथील नेस्को सेंटर मनसेच्या महाअधिवेशनातील भाषणादरम्यान दिली.

राज ठाकरे म्हणाले की, “राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असे होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणार नाही,” असे म्हणाले. दरम्यान, “आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार, असे राज ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Aprna

“शिवसेनेला टार्गेट केलं जातंय”, भावना गवळींचा आरोप

News Desk

मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेवर भर! – मुख्यमंत्री

Aprna