HW News Marathi
महाराष्ट्र

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आहे. या पार्श्वभूमीवर औरंगबाद पोलीस आयुक्तांनी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यानुसार, औरंगाबादमध्ये १३ दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीमध्ये पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येवू शकत नाही, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही. यामुळे आता प्रशासनाकडून राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीची प्रतिक्षेत मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निमयाचे न केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. 

राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी सरकारला ३ मेपर्यंता अल्टीमेटम दिला आहे. राज्यात सध्या भोंगा आणि हनुमान चालिसावरून राजकारण तापले आहे. यामुळे महाराष्ट्र दिनामित्ताने राज ठारे पुन्हा एकाद भोंग्यावरून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारन काल ( २५ एप्रिल) भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. परंतु, राज ठाकरेसह भाजपच्या बड्या नेत्यांनी देखील या बैठकीला गैरहजर राहिले होते. मनसेकडून संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी उपस्थित होते. या बैठकीनंतरही मनसे भोंग्याच्या मुद्यांवर ठाम असल्याचे त्यांच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

मनसेने राज ठाकरेंच्या औरंगबादच्या सभेचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत औरंगबादच्या सभेचा टीझर शेअर केला आहे. यात टीझरमध्ये मनसेने देखील शिवसेनेप्रमाणे औरंगबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला आहे. आणि चलो संभाजीनगर, एतिहासिक ‘राज’ सभा ऐकण्यासाठी, अशी घोषणा केली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हा अंतर्गत धोका असावा”, आशिष शेलारांचा टोमणा

News Desk

‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं’, राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका  

News Desk

मराठा आरक्षण | ५ जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही!

News Desk