HW News Marathi
महाराष्ट्र

…तर अधिकाऱ्यांना शॉक देणार, मनसेचा इशारा!

मुंबई | वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने आज (२६ नोव्हेंबर) राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून ‘झटका मोर्चा’च्या माध्यमातून वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावेळी वांद्रे येथे जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

या मोर्चात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच, नागरिकांचे वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, यापुढे आता वीज ग्राहक वाढीव वीजबिल भरणार नाही. बील भरले नाही म्हणून जर एमएसईबी आणि वीज कंपनीचे अधिकारी कनेक्शन कापायला आले, तर त्यांना शॉक देणार, असा इशारा मनसेच्या नेत्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, मोर्चा काढण्यावर मनसे नेते ठाम असल्याने वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. हा मोर्चा शांतपणे पार पडला. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी नागरिकांना वीजबिलाबाबत तत्काळ दिलासा द्यावा अशी मागणी मनसेने केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्याचे नवे गृहमंत्री माझे मित्र पण त्यांना बळीचा बकरा केलं!”

News Desk

मराठा आरक्षणासंबंधी बातचीत करण्यासाठी रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला!

News Desk

कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे – अस्लम शेख

News Desk