HW News Marathi
महाराष्ट्र

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय,मनसेचा सवाल  

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं शिवजयंती साजरी करताना सरकारी मार्गदर्शक सूचनेचं पालन करावं असे आदेश दिले आहेत, गृह विभागाने शिवजयंती कशी साजरी करावी याबाबत परिपत्रक काढलं आहे. शिवजयंती म्हटलं तर महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण होतं, मात्र यंदाच्या शिवजयंतीवर कोरोनाचं सावट असल्याने राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जाते, यातच मिरवणूक काढू नका, १०० पेक्षा जास्त जणांनी जमा होऊ नये असे आदेश सरकारने दिले आहेत, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.यातच विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे,.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवजयंती हा आपला वर्षातील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बारची वेळसारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंतीला नियमावली असा प्रश्न उपस्थित केला आहे.त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का? वेळीच ही नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका असा थेट इशाराच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आणि राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी कशी करावी याची नियमावली जाहीर केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण- सर्वोच न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार 

News Desk

कांजूर मेट्रो कारशेड प्रकरण : आदर्श वॉटर पार्कचा मालकी हक्क न्यायालयाने फेटाळला

Aprna

“एकीकडे मी लोकांना गर्दी करु नका असं सांगत असताना आज…”

News Desk