HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करा, मनसेची मागणी

मुंबई | २ दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसई-विरार येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, वसई-विरार महापालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयुक्त भेट देत नाहीत, म्हणून मनसेच्या २ कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या ६ महिन्यापासून पत्र व्यवहार आणि संपर्क साधूनही वसई-विरार पालिका आयुक्त वेळ देत नसल्याने आंदोलन केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं.

मात्र या घोषणा देणाऱ्या मनसेच्या २ कार्यकर्त्यांना तिथे बंदोबस्ताला हजर असणाऱ्या पोलीस निरीक्षण राजेंद्र कांबळे यांनी मारहाण आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे, त्याबाबत काही व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रात रोज विविध विषयांवर ठिकठिकाणी अनेक संघटना, पक्षांकडून शेकडो आंदोलन होत असतात, अशी आंदोलन हाताळण्याची एक पद्धत आहे व नियम आहेत, परंतु वसई-विरारमध्ये घडलेला प्रकार कोणत्याही राजकीय पक्षाच्या, संघटनेच्या किंवा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत घडणे योग्य नाही, पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हाताळलेले आंदोलन महाराष्ट्राच्या गृह खात्याला शोभा देणारे नसून अत्यंत घृणास्पद आहे असा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

तसेच आंदोलकांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली, त्याची ध्वनिफित इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर फिरत आहे. वास्तविक आंदोलनकर्त्यांना कार्यक्रम होईपर्यंत स्थानबद्ध करण्याची आवश्यकता होती, परंतु राजेंद्र कांबळे यांनी तसे न करता कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या अशा वर्तवणुकीमुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील २ सहकारी बँकांसह ४ बँकांवर RBI ची कारवाई

News Desk

मुंबईची बत्ती गुल झाल्यानंतर आता केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार

News Desk

उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं – किरीट सोमय्या 

News Desk