HW News Marathi
महाराष्ट्र

“मंदिरं सुरु न केल्यास, आम्हीच ती खुली करू”, मनसेचा राज्यसरकारला इशारा

पुणे | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं अजूनही बंद आहेत. सरकारच्या या निर्णयावरून त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. मात्र ही मंदिर भाविकांसाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.त्या पाठोपाठ आता ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर मनसेने घंटानाद आणि आरती करून आंदोलन केले आहे.

उद्धवा अजब तुझे सरकार…!

राज्य सरकारने मंदिरं सुरु करावी म्हणून भाजप नेत्यांनी ठिकठिकाणी राज्यात आंदोलनं केली. राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरं खुली न केल्यास, आम्ही मनसेच मंदिरं उघडेल असा इशारा मनसे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी मंदिरातील ‘देव बोले, उघडा दार उद्धव आता उघडा दार उद्धवा’, ‘मोर्चे चालू यात्रा चालू मग मंदीर बंद का ?’,’ उद्धवा अजब तुझे सरकार…!’, ‘आई राजा उदो उदो बिघाडी सरकारला उठव…’,असे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

भाविकांसाठी लवकरात लवकर खुली न केल्यास, तर आम्हीच मंदिरं खुली करू

मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे म्हणाले की, राज्यात सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. पण आपल्या राज्यातील मंदिरं अद्याप पर्यंत सुरू झालेली नाही. मंदिरं बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या मंडळीचा व्यवसाय ठप्प आहे. तसेच त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याबाबतचा विचार सरकारने लवकरात लवकर करावा. आज आम्ही घंटानाद आंदोलन केले आहे. सरकारने मंदिरं भाविकांसाठी लवकरात लवकर खुली न केल्यास, तर आम्हीच मंदिरं खुली करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

आमची मंदिरं उघडली गेलीच पाहिजे

‘आमची मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. आजचा हा दिवस होऊन जाऊ दे. याविषयी मी आमच्या लोकांची बैठक घेणार आहे. मंदिरी उघडली नाहीतर आम्ही मंदिरांबाहेर घंटानाद करु. माझं म्हणणं आहे, नियम लावायचा तर सगळ्यांनाच लावा तो देखील सारखाच.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सगळं सुरु झालं आहे, पण मंदिरं मात्र बंद

राज्यात अजूनही देऊळं बंद आहेत, परंतु शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरात अभिषेक करतानाचा विडिओ व्हायरल झाला आहे. यावरून देखील राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. . ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात पूजा केली तर चालते. मंदिर बंदचा नियम फक्त आम्हाला. आता तुम्ही पाहिलं असेल की, सगळं सुरु झालं आहे. पण मंदिरं मात्र बंद.’ असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारच्या मंदिर बंद नियमाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

News Desk

अकोल्यात आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह, अकोल्यात २ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारंच, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन!

News Desk