HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेचा रेल्वे प्रवास’, जनतेच्या हितासाठी करणार आंदोलन!

मुंबई | मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल लवकर सुरु करा, अशी मागणी सगळ्यांकडून केली जात आहे. विशेषतः उपनगरात राहणाऱ्या नागरिकांकडून ही मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २१ सप्टेंबरला जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे. मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी यांनी याबाबतची माहिती दिली.

“लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु आहे. पण बसमध्ये प्रचंड हाल होत आहे. जवळपास आठ तास लोकांना घरी जाण्यासाठी लागत आहे. लोकांचे हाल बघवत नाही. वारंवार विनंती करुन सरकार रेल्वे सेवा सुरु करत नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणाहून येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. विनंती करुन सरकार ऐकत नाही. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे,” असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई-वर्सोवामध्ये सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग

News Desk

नोटा बंदीच्या काळात जिल्हा बँकेचे १०१ कोटी बुडाले, पवारांनी दाखवले पत्र

News Desk

एका नटीचा एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करुन जाळला – सामना

News Desk