HW News Marathi
महाराष्ट्र

विमानातल्या प्रवाशाची बिघडली तब्येत, अन् केंद्रीय मंत्री भागवत कराडांच मोदींनीही केलं कौतुक!

नवी दिल्ली। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी विमान प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवले. दिल्ली-मुंबई विमानाच्या प्रवासादरम्यान एका प्रवाशाला अस्वस्थता जाणवण्यास सुरुवात झाली आणि त्याला आणि चक्कर येऊ लागली. अशा परिस्थितीत स्वत: केंद्रीय मंत्र्याने त्यांना मदत करून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. केंद्रीय मंत्री कराड हे बालरोगतज्ज्ञ देखील आहेत. त्यांनी त्या प्रवाशावर प्राथमिक उपचार केले. आणि याच त्यांच्या कार्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं आहे. कराड यांनी इंडिगो विमानात एका व्यक्तीला प्रथमोपचार देऊन त्याचे प्राण वाचवले. यानंतर डॉ. भागवत कराड यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून कराड यांचं कौतुक केलं आहे.

नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड हे पेशाने डॉक्टर आहेत. डॉक्टर असलेल्या भागवत कराड यांनी मात्र नियम बाजूला ठेवत विमानात एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. इंडिगो एअरलाईन्स मध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकाराचा आपल्या फेसबुक पोस्ट मधून कथन केले आहे.

मंत्रिपदाचा बळेजाव बाजूला ठेवत

केंद्रीय मंत्री भागवत कराड हे 15 ऑक्टोबर रोजी विमानातून प्रवास करत असताना डॉ भागवत कराड यांच्या मागील बाजुच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला. आणि त्यावेळी भागवत कराड यांनी पाहिले आणि त्याचवेळी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांना दिसून आलं. त्यानंतर त्यांनी आपले सगळे नियम आणि मंत्रिपदाचा बळेजाव बाजूला ठेवत आणि कोणत्याही प्रकारचा उशीर न करता या प्रवासाच्या मदतीला केंद्रीय मंत्री भागवत कराड धावून गेले. विमानात प्रवासादरम्यान हा घडलेला संपूर्ण प्रकार मात्र भागवत कराड यांनी फेसबुक पोस्ट करत सगळ्यांसमोर मांडला आहे.

प्रवास कर्तव्यदक्षतेचा….. !!

काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट IndiGo मध्ये 12 A सीट वर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड सुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. ” एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ” संतांची हि शिकवन कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एमडी-एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या अमित ठाकरेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

News Desk

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ।

News Desk

ठरलं! राज्यात ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होणार

News Desk