HW News Marathi
महाराष्ट्र

आईला बाजारात पाठवून घेतला गळफास

औरंगाबाद : नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी मुकुंदवाडी परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आईला बांगड्या घेण्यासाठी पैसे देऊन बाजारात पाठविले होते. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

अमोल पांडुरंग आणेराव (२६, रा. मुकुंदवाडी, रेल्वेपटरी परिसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल आणि त्याचे वडील हे मोबाइल कंपन्यांचे टॉवर उभे करण्याचे कामे करतात. सध्या त्यांचे काम नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. सतत बाहेरगावी राहून कामे करणारा अमोल चार दिवसांपूर्वी घरी आला होता. शनिवारी दुपारी त्याने त्याच्या आईला बांगड्या भरण्यासाठी पैसे दिले आणि बांगड्या भरून येण्यास सांगितले.

आई दुकानावर गेल्यानंतर घरात कुणीही नसताना त्याने छताच्या आढ्याला वायर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर त्याची आई घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसला. मुकुंदवाडी पोलिसांनी अमोलचा मृतदेह घाटी रुग्णालयातदाखल केला. बाहेरगावी असलेले अमोलचे वडील औरंगाबादेत आल्यानंतर रविवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

Click here to Reply or Forward
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड पोलीस दलासाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते संपन्न!

News Desk

टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

Aprna

आज होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंनी फिरवली पाठ

News Desk