HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १६ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई । देशभरासह राज्यातही आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. आज (९ जून) जारी झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात १६ हजार ३६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर याच एका दिवसात १० हजार ९८९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत राज्यात २६१ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यातील कोरोनास्थितीबाबतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ९७ हजार ३०४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत १ लाख १ हजार ८३३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे राज्याचा रिकव्हरी रेट ९५.४५ टक्के इतका झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यात आज तब्बल २६ हजारांहून अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

राज्य सरकारीची कार्यालय आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमावली जाहीर

News Desk

स्वयंशिस्तीचे पालन केल्यामुळे राज्यातील ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

News Desk