HW News Marathi
Covid-19

चिंता वाढली ! राज्यात आज ४ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात आज (१७ फेब्रुवारी) ४ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारी, राज्यात गेल्या २४ तासांत ४ हजार ७८७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ३,८५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनामुळे ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यात आतापर्यंत नोंद झालेली कोरोनाबधितांची एकूण संख्या २० लाख ७६ हजार ९३ इतकी असून १९ लाख ८५ हजार २६१ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण ३८ हजार १३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर राज्यात आतापर्यंत राज्यात ५१ हजार ६३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली असताना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, शासन-प्रशासन आता पुन्हा सतर्क झाले असून कडक निर्बंध लादण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप महाराष्ट्राचा शत्रू कि मित्र ?, जयंत पाटलांचा सवाल

News Desk

केंद्राने परवानगी दिल्यास सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून संमती | छगन भुजबळ

News Desk

अजित पवार आणि राजेश टोपे इन अ‍ॅक्शन मोड, दर आठवड्याला कोरोनाबाधित जिल्ह्यांचा करणार दौरा

News Desk