HW News Marathi
Covid-19

चिंता वाढली ! राज्यात आज ८ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यातच राज्य सरकारकडून आज (२४ फेब्रुवारी) जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीमुळे सरकारच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. राज्यात आज ८ हजार ८०७ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांतील हा मोठा आकडा असल्याने शासन-प्रशासनासह नागरिकांना अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.

राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, या सगळ्यात राज्यासाठी एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत नव्या २ हजार ७७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण २० लाख ८ हजार ६२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात एकूण ५९ हजार ३५८ ऍक्टिव्ह रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.७०% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात ‘कोविड १९ रुग्ण सेवा केंद्र’ सुरू केले !

News Desk

“कंगनाविरुद्धच्या शिवसेनेच्या आंदोलनाला परवानगी, मग ‘मनसे’ला नोटीस का ?”

News Desk

कोरोना बाधित १२८२ रुग्ण बरे होऊन घरी, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८५९० वर पोहोचली

News Desk