HW News Marathi
Covid-19

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका, नाहीतर…! नवनीत राणा आक्रमक

मुंबई । राज्यातील परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. एकीकडे शेतकरी झालेल्या नुकसानीने प्रचंड हवालदिल झालेला असताना दुसरीकडे राज्यात राजकारण मात्र थांबायचे नाव घेत नाही आहे. याच पार्श्वभूमीवर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज (१९ ऑक्टोबर) राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांसाठी मागणी केली आहे. “शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून सरसकट सर्वेक्षण करून दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी”, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

“कोणत्याही परिस्थितीत शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत. अन्यथा मी खासदार म्हणून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेन”, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे. नवनीत राणा यांनी आज अमरावती जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सोयाबीन व कपाशीच्या शेतात जाऊन पाहणी केली. दर्यापूर भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केल्यानंतर नवनीत राणा बोलत होत्या.

“राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे”, असा आरोपही यावेळी नवनीत राणा यांनी केला. दरम्यान, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सर्व बड्या नेत्यांच्या पाहणी दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे दोन्ही फळीतील नेत्यांचे राज्यभर पाहणी दौरे सुरू आहेत. याच, पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पेटत आहे. तर हवालदिल शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला निर्देश !

News Desk

सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

News Desk

मी केलेल्या चुका तुम्ही करु नका, जितेंद्र आव्हाड

News Desk