HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार प्रीतम मुंडेंच्या रॅलीला गोपीनाथ गडावरुन सुरुवात….

बीड। भगवानभक्ती गडावरील मेळाव्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांच्या कार रॅलीला सुरुवात झाली आहे. त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात केलीय, यावेळी त्या म्हणाल्या की दसरा मेळाव्याची परंपरा ही मुंडे साहेबांची परंपरा होती, त्यांनी या मेळाव्याच्या परंपरेला सुरुवात केली आहे. एक वर्ष मेळाव्याला खंड पडला मात्र आता या एक वर्षाच्या खंडानंतर ही रॅली निघत आहे. यावेळी लोकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. मात्र हा उत्साह दाखवताना लोकांनी आपापली काळजी घ्यावी. दरम्यान पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, त्या मेळाव्यातून जसा संकेत देतील तसा आमचा संकल्प असेल. अशी प्रतिक्रिया खासदार प्रीतम मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आता या दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे काय संकेत देणार ? आणि या संकेताला अनुसरून प्रीतम मुंडे काय संकल्प करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भगवानबाबा कोण?

भगवानबाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. ते मूळचे सावरगाव घाट येथील. त्यांनी या धौम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन, प्रवचन केले. या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. त्यामुळे धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला. भगवानबाबांचे निधन 1965 साली झाले. त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. त्यानंतर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री हे गडाचं काम पाहत आहेत.

35 वर्ष हा मेळावा घेत होते

भगवान गडावरील मेळाव्याला 50 वर्षाची परंपरा आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता.

विरोधकांचा नाव न घेता समाचार घेतला

मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले, तेव्हापासून जनतेतून गायब असलेले विरोधक दसरा-दिवाळी बघून येतात, एक दिवस लोकांमध्ये गेले की दुसऱ्या दिवशी सर्दी खोकला येतो आणि परत निघून जातात. मात्र आम्ही पहिल्या दिवसापासून मदत करण्याच्या भूमिकेत आहोत. शेकडो रुग्णांना कोविड काळात मदत केली, हजारो कुटुंबांना अन्न धान्य पुरवले, हजारोंना मोफत रेमडिसिव्हीर उपलब्ध करून दिले, त्यात काही भाजपचे कार्यकर्ते पण होते. पण आम्ही केलेली मदत या हाताची त्या हाताला कळू देत नाही, असा आमचा स्वभाव आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी विरोधकांचा नाव न घेता समाचार घेतला. या आणि अशा आणखी काही विषयांवर मी बोलणार आहे, सगळं आजच संपवत नाही, असा सूचक इशाराही धनंजय मुंडे यांनी विरोधकांना दिला.

शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला चिखल तुडवत गेलो

आम्ही अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला चिखल तुडवत गेलो, मात्र वर्षातून दिवाळी-दसऱ्याला येणाऱ्या विरोधकांनी त्यावरून टीका केली, त्यांना हे माहीत असावं की आम्ही नुसते फिरलो नाही, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुस्थिती सरकार दरबारी मांडून आर्थिक पॅकेजच्या स्वरूपात मदतही खेचून आणली. भाजपने जिल्ह्यात शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आंदोलन केले. तसेच आंदोलन लखीमपूर खिरी इतक्या घटनेबाबत भाजपकडून करणे अपेक्षित होते, मात्र भाजप इथल्या आणि तिथल्या शेतकऱ्यांबाबत वेगवेगळ्या भूमिकेत का आहे, असा सवालही मुंडेंनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरी अन् वाशीममध्ये २ जण कोरोना पॉझिटिव्ही, दिल्लीच्या मरकजमध्ये होते सहभागी

swarit

“…तर दिल्लीच्या नाका- तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील”, शिवसेनेचा घणाघात

News Desk

जळगाव : जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत १० कोटींची वाढ पालकमंत्र्यांच्या मागणीला यश

News Desk