HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार संभाजीराजेंची मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची घोषणा !

कोल्हापूर | मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस तापत चालला आहे. यासाठी खासदार संभाजीराजे यांनी ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरुन आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे कोल्हापूरातून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणाच्या या प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडलं आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँगमार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मूक आंदोलन छेडत असल्याची माहिती दिली. १६ जून रोजी होणारं हे आंदोलन कोल्हापूरातल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरु होईल. राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण नाही बोलायचं. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे.

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढणार असल्याचा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही पक्षासाठी नाही तर समाजासाठी आक्रमक भूमिका घेत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आता आक्रमक झालो आहोत, असंही ते म्हणाले.

संभाजीराजेंनी राजकारण्यांवरही घणाघाती टीका केली आहे. आपली व्होट बँक खराब होईल म्हणून राजकारणी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाही. पण मला ती काळजी नाही. आता आपण आक्रमक होणार, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही. आता आपण डोकं लावून भूमिका घ्यायची असंही ते म्हणाले.

संभाजीराजेंची मोठी घोषणा ! 16 जूनपासून कोल्हापूरातून होणार मराठा आंदोलनाला सुरुवात

संभाजीराजे छत्रपती यांनी काहीच दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती. तसेच 6 जूनपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास रायगडावरून राज्याभिषेक दिनीच आपण आंदोलनाची घोषणा करून असेही संभाजीराजे यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे, आज अखेर संभाजीराजेंनी ही आंदोलनाची घोषणा केली होती. संभाजीराजे छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले की, “मी राजकारणी नाही, मी राजकारण करत नाही. पण मधल्या काळात काही लोक माझ्यावर नाराज झाले. पण मी माझ्या समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. काही शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का?कुठे चुकलो असेन तर मी दिलगिर आहे. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ”, असेही संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाथरुममध्ये पडल्याने अतिरिक्त मुख्य गृहसचिव आयसीयूत

News Desk

शेतकरी आनंदी झाला म्हणून भाजपास एरंडेल घेऊन कळवळण्याचा अधिकार नाही !

News Desk

शिवसेनेचा मंत्री फडणवीसांना भेटायला तडफडत होता, निलेश राणेंच्या दाव्यावर उदय सामंत म्हणतात…

News Desk