HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय खासदार शरद पवारांची नाराजी

मुंबई। केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांच्या सहकाऱ्यांनी एकत्र बसायला हवं. 6 महिन्यांपूर्वी राजनाथ सिंह यांनी आम्हाला बोलावलं होतं. त्यामध्ये भारत चीन बॉर्डरवर नेमकं काय सुरू आहे याबाबत आम्हाला सांगितलं होतं. केंद्रावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दुसरीकडे चीनसोबत 13 वेळा बैठका घेण्यात आल्या, पण एकही बैठक यशस्वी झाली नाही.

5 वेळा छापे मारी केली त्यांना नेमकं काय तिथं मिळत आहे कळत नाही

पवार म्हणाले की, काल जे जवान शहीद झाले अशाप्रकारे मागच्या काही दिवसांत सातत्याने आशा बाबी घडत आहेत. त्यासाठी इतर पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन बोलायला हवं. केंद्र सरकार काही संस्थांचा सातत्याने गैर वापर करत आहे. यामध्ये सीबीआय, ईडी, एनसीबी आशा संस्थांचा वापर करत आहे. काही उदाहरणे सांगायचं झालं तर अनिल देशमुख यांचे उदाहरण घेता येईल. देशमुख यांच्याबाबत मागच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले ते आता कुठं आहेत हेच माहिती नाही.ईडी, सीबीआयच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं ते म्हणाले.पवार म्हणाले की, एक जबाबदार अधिकारी याबाबत आरोप करतो आहे. हे लक्षात आल्यानंतर तात्काळ राजीनामा दिला मात्र दुसरा व्यक्ती मात्र गायब झाला आहे. हा फरक सध्या आपल्याला पाहिला मिळत आहे. अनिल देशमुख यांच्याबाबतची चौकशी सध्या सुरू आहे. त्यांच्या घरी काल 5 वेळा छापे मारी केली. त्यांना नेमकं काय तिथं मिळत आहे कळत नाही. याबाबत जनतेने देखील विचार करायला हवा, असं पवार म्हणाले.

ती घटना सुदैवाने मीडियामुळं बाहेर आली

पवार म्हणाले की, मागच्या काही दिवसांत लखीमपुरची घटना घडली. ती घटना सुदैवाने मीडियामुळं बाहेर आली. यामध्ये शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली यामध्ये एक पत्रकार देखील त्यामध्ये होता. असा प्रकार या आधी असं कधी झालं नव्हतं. त्यामध्ये एक बाब समोर आली की केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचे चिरंजीव त्यामध्ये होते. जवळपास 6 दिवसांनंतर सुप्रीम कोर्टाने यावर भाष्य केले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे तोपर्यंत हा व्यक्ती त्यामध्ये नव्हता असं त्यांच्या पक्षांकडून सांगण्यात येत होतं. जरी त्यांचा व्यक्ती असला तरी त्यांनी लगेचच कारवाई करण्यात यायला हवी. या घटनेची जबाबदारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आपली जबाबदारी टाळता येणार नाही त्यामुळे त्यांनी तत्काळ पदावरून मुक्त व्हावं, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंनी गुन्हेगारांना पाठिशी घालू नये; संजय राऊतांचा निशाणा

News Desk

“पहाटेच्या शपथविधीमुळे फायदा एकच झाला…”, शरद पवारांचा वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

Aprna

मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना

Aprna