HW News Marathi
महाराष्ट्र

‘परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा आणि लोकलचं तिकीट मिळवा!’

मुंबई | महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांना रेलचा प्रवास अद्यापही बंदच आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना आणि लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्यांनाच लोकलने प्रवास करता येतो. त्यासाठी, विशेष पास काढणे आवश्यक आहे. मात्र, राज्यात 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमी मध्य रेल्वेने उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना एक दिवसाचा पास इश्यू करण्यात येणार आहे.

उमेदवारांना मुंबईसह उपनगरात प्रवासाची मुभा

मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात 4 सप्टेंबर रोजी विविध जिल्ह्यात एमपीएससीची परीक्षा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी परीक्षांसाठीचा बंदोबस्त आणि पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्यामुळे, परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, एमपीएससी परीक्षेसाठी ये-जा करणाऱ्या उमेदवारांना मुंबईसह उपनगरात प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, यासाठी परीक्षार्थीकडे हॉल तिकीट असणे बंधनकारक आहे. हॉल तिकीट दाखवल्यानंतरच लोकलचे तिकीट मिळेल, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे.राज्य सरकारचा निर्णय मनमानी आणि भेदभाव करणारा असून, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. केवळ कोरोनावरील दोन लस घेतलेल्या व्यक्तींना लोकल प्रवास करू देण्याचा सरकारचा निर्णय आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे, असे याचिकेत म्हटले आहे. ही याचिका वैद्यकीय सल्लागार योहन टेंग्रा यांनी ॲड. अभिषेक मिश्रा यांच्याद्वारे दाखल केली आहे.

लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवासास मुभा

मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

मुख्यमंत्र्यांची विनंती

सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात यापुढे कोळशाऐवजी अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य !

News Desk

जळगाव वसतीगृह महिला अत्याचार प्रकरणी विधानसभेत गदारोळ, ४ सदस्यीय चौकशी समिती केली गठीत – अनिल देशमुख

News Desk

अजित पवार आणि जयंत पाटलांवर गुन्हा दाखल केला पाहीजे, भाजपची मागणी

News Desk