HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना काळातील विजबिले कमी करण्याची मुंबई भाजपची मागणी

मुंबई | कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण भारतात २३ मार्च पासून लॉकडाऊन (ताळेबंदी) घोषित करण्यात आली. मुंबईतील उद्योग व्यवसाय या ताळेबंदीच्या काळात पूर्ण बंद राहिले. दुकाने व कार्यालये बंद राहिल्याने व्यावसायिकांना या काळात प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. तसेच अनेक नागरिकांचा पगार किंवा उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे.

दरम्यान, केंद्र सरकार नागरिकांना विविध सवलती देत असताना बेस्ट उपक्रमानेही वीज देयकात सवलत देऊन त्यात आपला वाटा उचलावा असेही आवाहन मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी आज दूरध्वनीवरून याविषयात चर्चा केली. मुंबईतील नागरिकांना वीज देयकांमध्ये तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी बागडे यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाने लोकांना गतवर्षीच्या विजवापराच्या सरासरीने वीज देयके पाठवली आहेत. नुकसानीत असलेल्या व्यावसायिकांना आणि उत्पन्नाचे साधन हरवलेल्या नागरिकांना हे संपूर्ण रकमेचे वीज देयक भरायला लावणे हा अन्याय आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळातील व्यावसायिक आणि घरगुती वापराची वीज देयके ही किमान रकमेनुसार आकारावीत अशी मागणी आज (१८ जून) मुंबई भाजपाकडून करण्यात आली आहे. वीज देयकात सवलत मिळाल्यास अडचणीत आलेल्या व्यावसायिक आणि नागरिकांना सावरण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने या गंभीर विषयात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचे गरिबांचे सरकार, गरिबांना बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते !

News Desk

महाविकासआघाडीत काडी टाकू नका; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

Aprna

महाराष्ट्रात अजून 25 -30 वर्ष भाजपची सत्ता येणार नाही; संजय राऊतांचा दावा

News Desk