HW News Marathi
महाराष्ट्र

अयोध्येला नक्की जावे, प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतल्याने तुमचे रक्त उफाळून येईल !

नवी मुंबई | अयोध्येला नक्की जावे. म्हणजे तुमचे खरे हिंदुत्वाचे रक्त जागे होईल, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला. यावेळी भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र केले आहे. आज (१६ फेब्रुवारी) नवी मुंबईत भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान, फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे निर्माण होणार आहे. यावरुन आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. आता अनेक लोक अयोध्येला जायाला निघालेत, जरू जावे, त्यांनी देखील जरू जावे. ज्या अयोध्ये करिता आम्ही बलिदान केले. त्या अयोध्येमध्ये जाऊन तुम्ही तिथे प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले. कदाचित तुमचे रक्त त्या ठिकाणी उफाळून येईल..आणि हिंदूत्वाला विरोध करणाऱ्याला तुम्ही या ठिकाणी पाठिशी घालणार नाही. या ठिकाणी तुम्हाला प्रभू श्री राम निश्चत असे मार्गदर्शन करेल, बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार या महाराष्ट्रात मांडला. या विचाराची आठवण कदाचित प्रभू श्रीराम तुम्हाला करून देईल, असा भाबडा विश्वास मी बाळगतो, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मला काही चुकीचे वाटत नाही!”

Aprna

राऊतांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर; राज्य सरकारने कारवाई करावी ! – नाना पटोले

Aprna

मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं, चंद्रकांत पाटलांचे त्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण

News Desk