HW News Marathi
Covid-19

‘MPSC परीक्षा रद्द होऊ नयेत’ हे माझं वैयक्तिक मत होतं, मात्र…! भुजबळांची नाराजी ?

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (९ ऑक्टोबर) जाहीर केल्याप्रमाणे ११ ऑक्टोबर रोजी होणारी MPSC ची परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत आता सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ या निर्णयप्रकारणी नाराज असल्याची चर्चा आहे. ” MPSC परीक्षा रद्द करू नये असे माझं वैयक्तिक मत आहे. मात्र, आता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे त्यावर आता जास्त चर्चा करता येणार नाही”, असे छगन भुजबळ म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या बैठकीत MPSC परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, या निर्णयावर आता जास्त चर्चा करता येणार नाही. पण याला २ बाजू होत्या. ‘काहींच्या मते परीक्षा वेळेतच झाल्या पाहिजेत तर काहींच्या मते परीक्षा होता कामा नये’ असे २ मतप्रवाह होते. या परीक्षांसाठी मुलं तयारी करतात. मराठा कुणबी, कुणबी मराठा या माध्यमातून ओबीसी समाजाची मुलंही येतात. त्यामुळे, परीक्षा रद्द करू नये असे माझं वैयक्तिक मत आहे. मी माझं मत सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कोविडची समस्या लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलल्या आहेत”, असे भुजबळ म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना मात्र छगन भुजबळ असेही म्हणाले कि, “परीक्षा जितक्या पुढे ढकलू तितकं वय निघून जाईल. ज्यांना आता नोकऱ्या मिळू शकतील, अशांना आपण का आडवत आहोत ? आमची भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणं आवश्यक आहे. भरतीच्या आड कोणीही येऊ नये, असं मला वाटत नाही.” त्याचप्रमाणे, संभाजीराजेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले कि, “राजे रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. राजांनी संपूर्ण समाजाचा विचार करावा. संभाजीराजे आपल्या तलवारीचा वापर ओबीसींवर करतात कि आणखी कोणावर ते बघावं लागेल”, असेही भुजबळ म्हणाले. मात्र, आपण तसे वक्तव्य केलेच नसल्याचे यापूर्वी संभाजीराजेंनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ८२४१ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच केंद्र सरकारची इच्छा आहे का?”

News Desk

जालन्यात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात भीतीचे वातावरण

News Desk