HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

मुंबई | महाविकासआघाडीतील एक प्रमुख पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून सध्या स्वबळाचा नारा दिला जात आहे. तसेच, काल (११ जुलै) महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यावर आता एबीपी माझाशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मेळाव्यात बोलताना केला आहे. आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा दावा पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असही नाना पटोले म्हणाले आहेत. यावर नाना पटोले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले बोलताना म्हणाले की, “तुम्हाला मिळालेल्या क्लिपचा अर्थ तसा नाही, माझे आरोप राज्य सरकारवर नव्हे तर केंद्र सरकारवर होते. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी हे बोललो खरं आहे की, पक्ष वाढीसाठी मी स्वबळाचा नारा दिला होता. मी बोललो तर चूक आणि इतरांनी हे वक्तव्य केलं तर ते योग्य? हे माझं वक्तव्य आहे.” तसेच पुढे बोलताना म्हणाले की, “पाळत ठेवण्याबाबत माझा सरकारवर कोणताही आरोप नाही. मी मुंबईत आल्यावर याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया देईन.”, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत का? अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना महाविकास आघाडीतील अनेक नेते महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हणत होते. यामध्ये खुद्द नाना पटोले यांचाही समावेश होता. पण, नाना पटोले मतभेद नाहीत असं एकीकडे सांगत आहेत, तर दुसरीकडे मात्र अनेक वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नाना पटोले यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळेही महाविकास आघाडीत मतभेद आहेत का?, असे प्रश्न निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही त्यांचा समाचार घेतला होता. नाना पटोलेंसारख्या लहान व्यक्तींवर मी बोलत नाही, असं भाष्यही शरद पवारांनी केलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार

Aprna

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक होणार तिरंगी, पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला चर्चेतून काढता पाय

News Desk

“…नाहीतर मी राजकारणात येणारच नव्हते” पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

News Desk