HW News Marathi
महाराष्ट्र

‘२०१४ मध्ये झाली तशी फसवणूक पुन्हा होणार नाही’, पटोलेंचं विधान

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. महाविकासआघाडीच्या विरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या स्वबळाच्या वक्तव्यावरून राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आज (१४ जुलै) नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

२०१४ मध्ये धोका झाला तोच परत होऊ नये

भाजपला काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही असं विधान, नाना पटोले यांनी आज (१४ जुलै) केलं. महाराष्ट्र राज्यात २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधात आहेत. नाना पटोले म्हणाले की, हायकमांडने मला पक्ष मजबुत करण्याची जबाबदारी दिली ती मी पार पाडणार आहे. मी काही शिवसेना- राष्ट्रवादीविरोधात अटॅक करत नाही. भाजप विरोधात करतो. ते म्हणाले की, २०१४ मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत. काँग्रेस मरणासन्न अवस्थेत आजीबातच नाही, संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते, असं नाना पटोले म्हणाले.

आमच्या पक्षाची ती स्ट्रॅटेजि आहे

शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे नाना पटोलें विरुद्ध नाराजी व्यक्त केल्या नंतर, नाना पटोलेंनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. नाना पटोले म्हणाले की, आमच्या पक्षाची स्टॅटर्जी आहे. त्यानुसार आमचे प्रभारी आणि नेते शरद पवारांना भेटायला गेले. ओबीसी आरक्षण जे भाजपनं संपवलं आहे. त्याविरोधात आम्ही एक आंदोलन उभं करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता होणार आहेत.

मराठा आरक्षणाबाबत भूमिका केंद्राकडून स्पष्ट झाली पाहीजे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे नेते शरद पवारांना भेटायला गेले होते, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, मला तिथं आमचे नेते गेलेले माहितीही नव्हतं. मला आमंत्रणही नव्हतं. माझा कुणावर व्यक्तिगत राग नाही. मला माझ्या पक्षाचं काम करायचं आहे. माझ्या पक्षाचं काम करताना कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही’, असंही नाना पटोले म्हणाले.

काय ठरलं बैठकीत?

काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाभेट घेतली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील कुरळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज पवारांच्या निवासस्थानी जाऊ त्यांची बुरीवर चर्चा केली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबतही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याशिवाय केंद्र सरकारने नवं सहकार खातं निर्माण केलं आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या गळाभेटीचे कारण काय…?

News Desk

“कोरोना लसीची किंमत लवकर ठरवा अन्यथा आंदोलन करु”, प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा

News Desk

पोरक्या बहीण- भावाची एका तपानंतर घडली भेट

News Desk