HW News Marathi
महाराष्ट्र

‘सीएम वगैरे गेले उडत’, नारायण राणेंचा संताप

रत्नागिरी | केंद्रीय मंत्री नारायण राणे हे काल(२६ जुलै) चिपळूण मध्ये पूर्वपरिस्थितीचा आढावा घेत होते. चिपळूणच्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित नसल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. व्यापाऱ्यांनी जेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर आल्या व्यथा मांडल्या त्यानंतर नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापलं. यावेळी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत असताना त्यांचा तोल ढळला ‘सीएम वगैरे गेला उडत.. इथे तुम्ही का नाही ते सांगा’, फोनवर असं म्हटलं आहे.

राणे का भडकले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल(२५ जुलै) चिपळुमनधल्या पुराचा आढावा घेत होते. त्यावेळी, ‘सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत अधिकारी सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. मग इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आत्तापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही. मला कुणीही सीईओ वगैरे भेटलेला नाही, मी बाजारपेठेतच उभा आहे, कुठे आहेत सीईओ दाखवा’ असं म्हणत नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झपलं आहे.

मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचा

नारायण राणे हे चिपळूण दौऱ्यावर आहेत . तिथली पाहणी करून झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण..आल्यापासून वादळं काय? पाऊस काय? सर्व चालुच आहे. करोना काय? करोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले करोना घेऊन आले. पाय बघायला पाहीजे, पांढऱ्या पायाचा”, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

“पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे.”, असा निशाणाही त्यांनी साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमधील ‘त्या’ चार बालकांच्या मृत्यू प्रकरणी अखेर चार वाळूमाफियांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल!

News Desk

“घरात राहायला तुम्ही सांगत होता मग तुम्हीच…”,भाजप प्रवक्त्या मोदींवर भडकल्या

News Desk

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला करण्याचा शासनाचा प्रयत्न! – अजित पवार

Aprna