HW News Marathi
महाराष्ट्र

‘एकनाथ शिंदे केवळ सही करणारे मंत्री’- नारायण राणे

वसई | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मारकाचे शुद्धीकरण करून घेतले होते. त्याबद्दल त्यांनी पुन्हा शिवसैनिकांवर टीका केली. मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी व दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले आहे अशा शब्दांत खोचक टीका केली.नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री उरले असून या विभागाच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने वसईत आलेल्या राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतानाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची ‘चिरंजीव मंत्री’ म्हणून खिल्ली उडवली.

एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री उरलेले आहेत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी वसई विरार शहरात आली. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री उरलेले आहेत. नगरविकास खात्याच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर होतात, असा आरोप त्यांनी केला. शिंदेदेखील या प्रकाराला कंटाळले असून लवकरच निर्णय होईल, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. मी घरात आणि पिंजऱ्यात बसून काम करणारा नाही. व्यासपीठावर डावी-उजवीकडे बघून उत्तरे देत नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुंबईतही गुरुवारी आणि शुक्रवारी विविध ठिकाणी गेलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी, आग्रीपाडा, सहार विमानतळ, काळाचौकी, शीव, आझाद मैदान, गावदेवी, मुलुंड, पवई, एमआयडीसी, मेघवाडी, गोरेगाव, चारकोप, बोरीवली आदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३६ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्तीव्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांची थट्टा, परिपत्रकातील निकषांवर सर्व स्तरांतून टीका

News Desk

सरसकट युती किंवा आघाडी करणार नाही, नवाब मलिक यांचं मोठं विधान!

News Desk

‘प्रशासनाचा दरार नसेल तर अधिकाऱ्यांवर हल्ले होतात’ – जितेंद्र आव्हाड

News Desk