HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे यांची कॉँग्रेसला सोडचिठ्ठी

सिंधुदुर्ग- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर काँग्रेसला अखेर रामराम केला. काँग्रेसने चार वेळा मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन पाळले नाही, असे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पण त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचे समजते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार, असे नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले होते. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा बट्ट्याबोळ केला, असा आरोप करत नारायण राणे यांनी सोमवारी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. मी नाराज असल्याच्या बातम्या येत असतानाही काँग्रेसचा एकही नेता माझ्याशी बोलला नाही. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करताना कोणीच विचारले नाही. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय नियमबाह्य असल्याचे राणेंनी म्हटले होते.

दरम्यान नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर कॉँग्रेसच्या बड्या नेत्यांवर टीकास्र सोडले. आपल्यासोबत अनेकजण राजीनामा देणार आहेत. राज्याचा दौरा करून पुढील दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राणे यांनी आमच्या शुभेच्छा आहेत, असे कॉँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…नाहीतर मी राजकारणात येणारच नव्हते” पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

News Desk

‘मुंबई पोलीस’ आपला ब्रँड बाजारात आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या काय काय वस्तू असणार

Aprna

‘केवढ्याला पडलं तुम्हाला? फुग्याला भोक तुमच्या पडलं!’ भाजपचं सामन्यावर प्रत्युत्तर

News Desk