HW News Marathi
महाराष्ट्र

“संत संजय राठोड लगे रहो”, नारायण राणेंची खोचक टीका  

सिंधुदुर्ग | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण हीच्या आत्महत्येत नाव आले आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपने या मुद्यावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. संजय राठोड यांच्यावर क़डक कारवाई करण्याची मागीणी करण्यात आली. आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी याच विषयावरुन ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

‘तुम्ही मेहनत करुन क्लिप बाहेर काढली, पण एवढं असताना चौकशी होत नाही. त्या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज कोणाचा आहे. संभाषण कोणाचं आहे. तिला डॉक्टरकडे ने, हे कर ते कर, हा आवाज कोणाचा आहे. संजय राठोड १५ दिवसांनी सांगतात, भाजप कुटुंब उद्धवस्त करायला निघाले, भाजपला काही कामधंदे नाहीत का?? असा सवालही राणेंनी उपस्थित केला.कोण आला रे कोण आला बंजाऱ्यांचा वाघ आला. पूजा चव्हाण यांचा मृत्यू आत्महत्येने झाला की त्यांचा खून झाला हे समोर आलेलं नाही’.

‘पण राठोड आणि पूजा यांच्या अकरा व्हिडीओ क्लिप समोर आल्या आहेत. या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं. ते पंधरा दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. ते संत आहेत का? मंदिरात जायला? ज्याच्यावर आरोप आहेत. आरोपाला सामोरे जा. पळताय कशाला? मग क्लिपचा आवाज खराय की खोटाय हे आधी सरकारने आम्हाला सांगावं. सरकार विनयभंग, बलात्कार, खून करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतं’.

‘सरकार सुशांत सिंग, दिशा सालियान, पूजा केस या सर्व केसमध्ये आरोपींना पाठिशी घालतंय. या सरकारला लायसन्स दिलंय का?बलात्कार केलेल्या माणसांना वाघ म्हणाल तुम्ही? ही कमाल आहे. मी आता त्यांना संत म्हणतो. संत संजय राठोड लगे रहो. समाजाने जो विकास कामे करतो त्याच्या पाठिमागे जावं. कुठलंही कृत्य करणाऱ्याच्या पाठीमागे जाऊ नये, असं माझं सांगणं आहे. वाघ असेल तर सांभाळा. सरकारने सांभाळावं. पिंजऱ्यात ठेवा नाहीतर मातोश्रीत एक पिंजरा लाऊन ठेवा’, असेही राणे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरेंचे ‘हे’ स्वप्न उद्धव ठाकरे पूर्ण करणार; औरंगाबादच्या सभेत दिले संकेत

Aprna

गोदावरीतील जलसमाधीचे पाणी संतापाची लाट बनून मुख्यमंत्र्यांच्या अंगावर उसळले | उद्धव ठाकरे

News Desk

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत! – मुख्यमंत्री

Aprna