HW News Marathi
महाराष्ट्र

या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आहे, राणेंची मुख्यमंत्र्यावर जहरी टीका  

सिंधुदुर्ग | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण हीच्या आत्महत्येत नाव आले आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा याच विषयावरुन ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. महाविकासआघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतरं असा मुख्यमंत्री कोणी केला असता. उद्धव ठाकरेंचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे, अशी सणसणीत टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.पत्रकार परिषदेत आज ते बोलत होते.

“महाविकासआघाडीचे सरकार पवारांच्या कृपेमुळे बसलं आहे. नाहीतर असा मुख्यमंत्री कोणी केला असता? या राज्यातील कोणताही सरपंच या मुख्यमंत्र्यांपेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे माहिती असलेला आहे,” अशी टीका राणेंनी केली आहे. “उद्धव ठाकरेंचे कोणीही ऐकत नाही. कारवाई केली तर हातात आहेत तीही लोक पळतील. ते घरातून बोलतात. लोकांसमोर येऊन बोलत नाही. मंत्रालयात ते येत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना सांगतात. इतरांना ५० माणसं जमवू द्यायची नाही आणि संजय राठोडवर काय कारवाई केली. टीव्हीवरुन बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतात तुम्ही काही उत्तर देत नाही. लोकं समोर नव्हते. त्यांचं कोणीही ऐकत नाही. म्हणूनच महाराष्ट्राची ही अवस्था आहे,” असेही नारायण राणे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

News Desk

“मुख्यमंत्री राजकीय वक्तव्य करतात याचं आश्चर्य वाटतं”, मुख्यमंत्र्यांच्या वैफल्यग्रस्त विधानावर फडणवीसांचा पलटवार

News Desk

#CoronaVarrus : राज्यातील पहिल्या ‘कोरोना’बाधित दाम्पत्यांना आज मिळणार डिस्चार्ज

swarit